पंतप्रधानांनी वेगळे आर्थिक पॅकेज दिले पाहिजे : संजय राऊत

मुंबई (वृत्तसंस्था) मुंबईचे आर्थिक महत्त्व देशात आणि जगात टिकणं महत्त्वाचं आहे त्यामुळे पंतप्रधानांनी वेगळं आर्थिक पॅकेज दिले पाहिजे, अशी मागणी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली आहे.

 

संजय राऊत यांनी मुंबईसारख्या शहरांचे महत्त्व टिकवणे गरजेचे असून आताच्या घडीला लाखो मजुरांनी मुंबईतून स्थलांतर केले आहे. मुंबईत त्यांचे पोट भरत नसल्याने ते आपापल्या राज्यात निघून गेले आहेत. देशाच्या आर्थिक राजधानीचे महत्त्व टिकवणे महत्त्वाचे आहे. मुंबईचे आर्थिक महत्त्व देशात आणि जगात टिकणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे पंतप्रधानांनी वेगळे आर्थिक पॅकेज दिले पाहिजे,” असेही संजय राऊत यांनी म्हटले. एवढेच नव्हे तर, मुंबईतून २० ते २५ क्के महसूल देशाच्या तिजोरीत जमा केला जातो. त्यामुळे फक्त मुंबईच नाही तर मुंबईसारख्या शहरांसाठी आर्थिक पॅकेज देणे गरजेचे आहे,असेही राऊत म्हटले.

Protected Content