पंतप्रधानांच्या भेकडपणामुळे चीनला आमची जमीन घेण्याची संधी मिळालीय : राहुल गांधी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) पंतप्रधानांच्या भेकडपणामुळे चीनला आमची जमीन घेण्याची संधी मिळालीय आणि त्यांच्या खोटारडेपणामुळे चीनला ती जमीन आपल्या ताब्यात ठेवणे सोयीचे जाणार आहे, अशा शब्दात कॉंग्रेस नेते तथा खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कडवट टीका केली आहे.

 

राहुल गांधी गेल्या अनेक दिवसांपासून भारत-चीन सीमावादावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करत आहेत. त्यांनी एका ट्विटद्वारे नरेंद्र मोदींवर भारत-चीन सीमावादाच्या मुद्द्यावरून जोरदार टीका केली आहे. राहुल यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, देशातील सर्वांचा लष्कराच्या क्षमतेवर आणि शौर्यावर विश्वास आहे. मात्र एकट्या पंतप्रधान नरेंद्र मोदींचा लष्कराच्या क्षमेतवर आणि शौर्यावर विश्वास नाही. पंतप्रधानांच्या भेकडपणामुळे चीनला आमची जमीन घेण्याची संधी मिळालीय आणि त्यांच्या खोटारडेपणामुळे चीनला ती जमीन आपल्या ताब्यात ठेवणे सोयीचे जाणार आहे, अशा शब्दात राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

Protected Content