नवाब मलिक यांची चंद्रकांत पाटलांवर टीका

 

 

मुंबई : वृत्तसंस्था । अब्दूल कलाम यांना राष्ट्रपती करण्याचा निर्णय एकमताने झाला होता. त्यात नरेंद्र मोदींचा सहभाग नव्हता, उलट त्यावेळी अटलजी मोदींना राजधर्म काय याचा धडा शिकवत होते,” असा टोला राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी चंद्रकांत पाटलांना लगावला

 

 

‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना राष्ट्रपती केलं”, असं अजब विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं. त्यानंतर चंद्रकांत पाटलांच्या या विधानाची दखल घेत राष्ट्रवादीने त्यांना माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या राजधर्म पाळण्याच्या सल्ल्याची आठवण करुन दिली आहे. “

 

“कलाम राष्ट्रपती झाले; तेव्हा अटलजी सत्तेत होते. कलाम यांना राष्ट्रपती करण्याचा निर्णय एकमताने झाला होता. त्यामध्ये नरेंद्र मोदींचा सहभाग नव्हता, उलट त्या काळात अटलजी मोदींना राजधर्म काय?, याचा धडा शिकवत होते,” अशी टिप्पणी नवाब मलिक यांनी केली.

 

 

यावेळी  त्यांनी कोरोनावर भाष्य केले. “आम्ही ऊद्यापासून जनता दरबारही रद्द करण्याचा घेतला आहे. मात्र, भाजपकडून राजकीय कार्यक्रम मोठ्या संख्येनं घेतले जात आहेत. लॉकडूनमध्ये विरोधकांनी हे ऊघडा ते ऊघडा अशी मागणी केली. आता ते उलटा आरोप करत आहेत,” असे मलिक म्हणाले.

 

केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांनी सीएए  कायदा लागू करणार असल्याचे म्हटले आहे. यावर मलिक यांनी  भाजपची सत्ता जास्त काळ टिकणार नसल्याचं म्हटलंय. “अमित शाह सांगतात की लसीकरणानंतर सीएए कायदा लागू केला जाईल. पण ज्या गतीने लसीकरणाचा कार्यक्रम सुरू आहे; ते पाहता हा कार्यक्रम आणखी ५  वर्षे पूर्ण होणार नाही. आगामी काळात पश्चिम बंगाल, आसामच्या निवडणुका आहेत. त्यामुळे शाह असे विधान करत आहेत,” असे मलिक म्हणाले. लसीकरण संपेपर्यंत मोदी सरकार टीकणार नसल्याचा दावाही त्यांनी केला.

 

 

पुण्यातील युवा वॉरियर्स अभियानात  चंद्रकांत पाटील यांनी देशभक्त मुस्लिम आणि देशद्रोही मुस्लिम यांच्यातला फरक समजावून सांगताना काश्मीरमध्ये बॉम्बस्फोट करणारा मुस्लिम देशद्रोही तर देशसाठी झटणारा मुस्लिम देशभक्त मुस्लिम असल्याचं सांगितलं. आपला सगळ्या मुस्लिमांना विरोध नाही.  देशद्रोही मुस्लिमांना विरोध असल्याचं सांगितलं. मात्र काही जण नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध काहीतरी काळंबेरं पसरवत असतात. पण अब्दुल कलाम यांच्यासारख्या कर्तृत्ववान माणसाला, संशोधक माणसाला नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती केलं, असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं.

Protected Content