नवी दिल्ली (वृत्तसंस्था) मागील चोवीस तासांमध्ये देशभरात कोरोनाचे सर्वाधिक तब्बल १२ हजार ८८१ रुग्ण वाढले असून, ३३४ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. याचबरोबर देशातील करोना रुग्णांची संख्या ३ लाख ६६ हजार ९४६ वर पोहचली आहे.
आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून मिळालेल्या माहिती नुसार भारतात १२ हजार २३७ रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. असे असले तरी दुसरीकडे निरोगी होणाऱ्या रुग्णांची संख्याही काही कमी नाही आहे. भारतात आतापर्यंत १ लाख ९४ हजार ३२४ रुग्ण निरोगीही झाले आहेत. देशात सध्या १ लाख ६० हजार ३८४ सक्रीय रुग्ण आहेत. दरम्यान, महाराष्ट्रात बुधवारी ३३०७ रुग्णांनी नोंद झाली. तर, ११४ लोकांचा मृत्यू झाला. तर राज्यातील एकूण संक्रमितांचा आकडा १ लाख १६ हजार ७५२ झाला आहे.