दिल्ली हिंसाचार पूर्वनियोजित कट, अमित शहांनी राजीनामा द्यावा : सोनिया गांधी

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) दिल्लीतील हिंसाचार हा पूर्वनियोजित कट असून उद्भवलेल्या स्थितीला केंद्र सरकार, आणि गृहमंत्री अमित शहा जबाबदार आहेत. त्यामुळे गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी एका पत्रकार परिषदेत केली.

काँग्रेस पक्षाच्या कार्य समितीच्या बैठकीनंतर सोनिया गांधी यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी सोनिया गांधी म्हणाल्या की, दिल्लीत शांतता राखण्यात केंद्र सरकार, गृहमंत्री अमित शहा आणि दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांना अपयश आले आहे. तसेच भाजप नेत्यांनी लोकांच्या भावना भडकतील, अशी भाषणे करत द्वेष पसरवण्याचे काम केले. भाजपच्या नेत्यांनी दिल्लीतील पोलिसांनी तीन दिवसांची मुदत देत, यानंतर जे काही होईल त्याबद्दल आम्हाला सांगू नका अशी चिथावणीखोर वक्तव्ये केली, असे सांगत या हिंसाचारात २० पेक्षा अधिक लोकांचे बळी गेल्याचे सोनिया गांधी म्हणाल्या.

Protected Content