दिलासादायक : आज पाच तालुके निरंक; जिल्ह्यात ३८ रूग्ण कोरोना बाधित

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा प्रशासनाने पाठविलेल्या अहवालात जिल्ह्यात आज एकुण ३८ रूग्ण आढळून आलेत तर ८६ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. आज देखील पाच तालुके निरंक रूग्ण संख्या आढळून आले आहेत.

आजची आकडेवारी
जळगाव शहर-१८, जळगाव ग्रामीण-१, भुसावळ-१, अमळनेर-१, चोपडा-२, पाचोरा-०, भडगाव-०, धरणगाव-१, यावल-१, एरंडोल-०, जामनेर-४, रावेर-६, पारोळा-०, चाळीसगाव-२, मुक्ताईनगर-०, बोदवड-१ असे एकुण ३८ रूग्ण कोरोना बाधित आढळून आले आहे.

जिल्ह्यात एकुण रूग्ण संख्या ५३ हजार २३१ वर पोहचली आहे. आजच्या संख्योन ७९१ रूग्ण उपचार घेत आहे. तर ५१ हजार १७२ रूग्ण बरे होवून परतले आहे. आज एक रूग्णाचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत १ हजार २६८ जणांचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा प्रशासनातर्फे देण्यात आला आहे.

Protected Content