दहा लाखासाठी विवाहितेचा छळ; पतीसह पाच जणांवर गुन्हा दाखल

जळगाव प्रतिनिधी । जळगाव येथील माहेर असलेल्या ३३ वर्षीय विवाहितेला मुंबईत प्लॅट घेण्यासाठी माहेरहून १० लाख रूपये आणावे यासाठी शारिरीक व मानसिक छळ करणाऱ्या पतीसह पाच जणांवर रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, आश्विनी महेंद्र पाटील यांचा विवाहित एरंडोल तालुक्यातील पातरखेडा येथील महेंद्र भगावन पाटील यांच्याशी मे २०१० मध्ये झाला होता.  महेंद्र पाटील हे मुंबईत पोलीस कान्स्टेबल नोकरीला आहे. लग्नाच्या दुसऱ्या दिवसांपासून विवाहितेला लग्नात मानपान व हुंडा कमी दिला म्हणून टोमणे मारणे सुरू केले. तर अंगावरील श्रीधन काढून दे असे सांगितल्यावर विवाहितला माहेरी पाठवून दिले. त्यानंतर मध्यस्थी करून पुन्हा संसार करण्यास पाठविले. दरम्यान, विवाहिता गर्भवती असतांना देखील सासू सरलबाई भगवान पाटील, जेठ दिपक भगवान पाटील, जेठानी उज्वला दिपक पाटील, नणंद मनिषा संजय बोरसे रा. पातरखेडा ता. एरंडोल यांनी शारिरीक व मानसिक छळ केला. तर पती महेंद्र पाटील हा दारू पिऊन शिवीगाळ करू लागला. महेंद्र याने पत्नी आश्विनीला मुंबईत घेवून गेल्यानंतर तिच्या नावाने बँकेत खाते उघडून ऑनलाईन कर्ज काढले त्यामुळे तिच्या नंबरवर फायनान्स कंपनीकडून पैश्यांसाठी तगादा असल्यामुळे मानसिक त्रास होत होता. हा सर्व प्रकार असहाय्य झाल्याने विवाहिता माहेरी निघून आल्या. विवाहितेच्या फिर्यादीवरून पतीसह पाच जणांवर रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास रामानंद नगर पोलीस कर्मचारी करीत आहे. 

Protected Content