‘ती’ भीती संजय राऊत भाजपच्या नावाने बोलून दाखवताय : चंद्रकांत पाटील

मुंबई (वृत्तसंस्था) महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांत सुरू असलेल्या भांडणामुळे सरकार पडेल, अशी भीती संजय राऊत यांना वाटत आहे. त्यांची ही ते भाजपच्या नावाने बोलून दाखवत आहेत, असा पलटवार भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

 

खासदार संजय राऊत यांनी रविवारी शिवसेनेच्या मुखपत्रातून भाजप आॅक्टोबरपर्यंत सरकार पाडण्यासाठी पैजा लावल्या जात आहेत, असा आरोप भाजपवर केला होता. यावर चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांत सुरू असलेल्या भांडणामुळे सरकार पडेल, अशी भीती संजय राऊत यांना वाटत आहे. त्यांची ही ते भाजपच्या नावाने बोलून दाखवत आहे, असा पलटवार करत कोरोनासारख्या गंभीर परिस्थितीत महाराष्ट्र अडकला असताना भाजपवर खोटे आरोप करणे राऊत यांना महत्त्वाचे वाटते, अशी टीका केली आहे. राज्य सरकारचा प्रत्येक प्रयत्न हा गेल्या तीन महिन्यांपासून दिशाहीन असल्याचे संपूर्ण देशाला माहीत आहे. या सरकारच्या कार्यकाळात पोलीस, डॉक्टर, परिचारिका, सफाई कर्मचारी, शेतकरी यांच्या समस्या सोडवावीशीदेखील वाटत नाही. श्री. पाटील म्हणाले.

Protected Content