टीवायबीए पदवीच्या अंतीमवर्ष फेर परिक्षेची संधी द्या : युवक काँग्रेसची मागणी

यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ येथे अंतिम वर्षाच्या परिक्षेत गैरहजर राहिलेल्या विद्यार्थी यांना फेर परीक्षांची संधी देण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन युवक काँग्रेसच्या वतीने विद्यापीठाचे कुलगुरू विजय माहेश्वरी यांना रावेर यावल विधानसभा क्षेत्राचे युवक काँग्रेसचे अध्यक्ष यांच्या वतीने देण्यात आले आहे.

मोहम्मद फैजान शाह यांनी दिलेल्या मागणी निवेदनात म्हटले आहे की , विद्यापिठाशी संबधीत महाविद्यालयातील पदवीच्या अंतिम वर्षात शैक्षणीक सत्रातील टीवाय बीए वर्षाच्या काही विद्यार्थी काही कारणामुळे परीक्षेला गैर हजर होते. काही विद्यार्थ्यांची इच्छा न होती म्हणून ही गैरहजर रहावे लागले, अशा वेळेच पदवीच्या महत्वपुर्ण परिक्षेपासुन विद्यार्थांना वंचित ठेवू नये आणि त्यांचा अंतिम वर्ष त्यांची पदवी वाय जावु नये याचं अनुषंगाने असे विद्यार्थी यांना कवयित्री बहीणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ येथे टीवाय बिएच्या फेर परीक्षेची संधी मिळावी, या संदर्भातील मागणीचे निवेदन युवक काँग्रेसचे रावेर यावल विधानसभा क्षेत्र अध्यक्ष मोहम्मद फैज़ान शाह यांनी कुलगुरू विजय महेश्वरी यांना सादर दिले आहे. विद्यार्थी हिताच्या दृष्टीकोणातुन निर्णय विद्यापिठाचे कुलगुरू विजय माहेश्वरी घेतील अशी अपेक्षा व विश्वास ही फैजान शाह यांनी व्यक्त केली आहे.

Protected Content