जुन्या भांडणाच्या कारणावरून महिलेची दुचाकी जाळली

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  अमळनेर तालुक्यातील एकलहरे येथे मागील भांडणाच्या कारणावरून महिलेची घरासमोर लावलेली दुचाकी जाळून नुकसान केल्याची घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी बुधवार १९ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजता मारवड पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, शितल तानाजी वाघ (वय-२५) रा. एकलहर ता. अमळनेर या महिला आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. शेती करून आपला उदरनिर्वाह करतात. जुन्या भांडणाच्या कारणावरून गावात राहणारे फत्तेलाल अर्जून पाटील, किर्तीकुमार सयाजी पाटील आणि जितेंद्र अशोक पाटील यांनी मंगळवार १८ एप्रिलरोजी मध्यरात्री महिलेच्या घराच्या ओट्यावर लावलेली दुचाकी जाळून नुकसान केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी महिलेने मारवड पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी फत्तेलाल अर्जून पाटील, किर्तीकुमार सयाजी पाटील आणि जितेंद्र अशोक पाटील सर्व रा. एकलहरे ता. अमळनेर यांच्या विरोधात मारवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास विभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव करीत आहे.

Protected Content