खळबळजनक : मनमाडमध्ये एकाच कुटुंबातील चौघांची झोपेतच गळा चिरून हत्या

नांदगाव (वृत्तसंस्था) एकाच कुटुंबातील चार जणांची झोपेतच तीक्ष्ण हत्याराने गळा चिरून हत्या केल्यामुळे मनमाडमध्ये एकच खळबळ उडाली आहे. नांदगाव तालुक्यातील वखारी इथं ही घटना घडली आहे. मयतांमध्ये दोन लहान मुलांसह आई आणि वडिलांचा समावेश आहे.

चव्हाण कुटुंबीय हे नेहमी प्रमाणे आपल्या घराबारे झोपलेले होते. गुरुवारी मध्यरात्री मारेकऱ्याने समाधान चव्हाण (वय ३७) भरताबाई चव्हाण (वय ३२) गणेश चव्हाण (वय ६) आरोही चव्हाण (वय ४) अशा चौघांची झोपेतच तीक्ष्ण हत्याराने गळा चिरून हत्या केली. एकमेकांच्या जवळच झोपलेल्या कुटुंबातील चौघांची हत्या करण्यात आली. एकाच कुटुंबातील चौघांची हत्या का करण्यात आली, याचे कारण समोर आलेले नाही. या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.

Protected Content