कोरोना : आज नऊ तालुके निरंक; जिल्ह्यातून ३४ रूग्ण कोरोना बाधित

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा प्रशासनाने आज पाठविलेल्या अहवालात जिल्ह्यात तब्बत नऊ तालुके निरंक असल्याचे दिसून आले आहे. जिल्ह्यातून आज ३४ रूग्ण बाधित असल्याचे दिसून आले आहे. तर १०४ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे.

आजची आकडेवारी
जिल्हा प्रशानाकडून आलेल्या आकडेवारीत पाचोरा, भडगाव, धरणगाव, यावल,एरंडोल, जामनेर, पारोळा, चाळीसगाव आणि बोदवड तालुक्यात रूग्ण निरंक आले आहेत. तर जळगाव शहर-२, जळगाव ग्रामीण-५, भुसावळ-१४, अमळनेर-१, चोपडा-२, रावेर-२, मुक्ताईनगर-८ असे एकुण ३४ रूग्ण बाधित आढळून आले आहे.

जिल्ह्यात एकुण ५३ हजार २६५ रूग्ण बाधित आढळून आले आहे. त्यापैकी ५१ हजार २७६ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर ७२० रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. आज १ रूग्णाचा मृत्यू झाला असून एकुण १ हजार २६९ रूग्णांचा मृत्यू झालाय. जिल्ह्यातील रिकव्हरी रेट हा ९६.२७ टक्क्यांवर येवून पोहचला आहे. अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिलेल्या अहवालात नमूद केले आहे.

Protected Content