उपमहापौरांचा दर गुरुवारी जनता दरबार (व्हिडिओ)

 

जळगाव, प्रतिनिधी । नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी ‘उपमहापौर आपल्या दारी’ हा उपक्रम राबविल्यानंतर प्रत्येक गुरुवारी जनता दरबार भरविण्याचा मानस उपमहापौर सुनील खडके यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. याप्रसंगी नगरसेविका अॅड. शुचिता हाडा, नगरसेवक नवनाथ दारकुंडे, अमित काळे, मनोज आहुजा, पिंटू काळे आदी उपस्थित होते.

‘उपमहापौर आपल्या दारी’उपक्रमांतर्गत सुनील खडके यांनी प्रत्येक प्रभागात भेट देऊन नागरिकांच्या अडचणी जाणून घेत त्या सोडविण्यासाठी प्रयत्न केले. या दौऱ्यानंतरही नागरिक त्यांच्या समस्या उपमहापौर यांच्याकडे मांडत असल्याने श्री. खडके यांनी ‘जनता दरबार’ चा उपक्रम हाती घेतला आहे. हा ‘जनता दरबार’ २१ जानेवारीपासून महिनाभर प्रत्येक गुरुवारी घेण्यात येणार आहे. जेष्ठ नागरिकांना सोयीस्कर व्हावे यासाठी महापालिका प्रशाकीय इमारतीच्या प्रांगणात ‘जनता दरबार’ सकाळी ११ ते दुपारी १ वाजेपर्यंत घेण्यात येणार आहे. यावेळी प्रशासकीय अधिकारी देखील उपस्थित राहतील. नागरिकांच्या समस्या तत्काळ सोडविण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. नागरिकांच्या तक्रारी लिखित स्वरुपात घेऊन शक्य त्या तक्रारींचा अधिकाऱ्यांकडून जागीच निपटारा करवून घेण्याचा प्रयत्न असल्याचा उपमहापौर श्री. खडके यांनी सांगितले. नागरिकांनी या सुवेधेचा लाभ घ्यावा असे आवाहन उपमहापौर सुनील खडके यांनी केले आहे.

 

https://www.facebook.com/508992935887325/videos/423949099019733

 

Protected Content