जळगाव, प्रतिनिधी । राज्यातील पूरग्रस्त जिल्ह्यातील नागरिकांना मदतीचा हात देण्यासाठी महानगर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष महिला आघाडीतर्फे शहरात मदत फेरी काढण्यात येणार आहे.
उद्या बुधवार २८ जुलै रोजी महानगर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला आघाडीतर्फे राज्यातील पूरग्रस्त जिल्ह्यातील बेघर झालेल्या नागरिकांना मदतीचा हाथ द्या असे आवाहन करत मदत फेरी काढण्यात येणार आहे. या मदत फेरीची सुरुवात सकाळी १०.३० वाजता टॉवर चौकातून करण्यात येणार आहे. तरी याप्रसंगी सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला आघाडी महानगरप्रमुख मंगला पाटील यांनी केले आहे.