उत्तर प्रदेशासह महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावा!- खा. राऊत

मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा – राष्ट्रपती राजवट लावायाचीच असेल तर महाराष्ट्रासह उत्तर प्रदेशात देखील लावा अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे खा. संजय राऊत यांनी दिली आहे.

खार पोलीस ठाण्यात सोमय्या यांच्या वाहनावर दगडफेकीत सोमय्या जखमी झाले होते, यानंतर भाजपा शिष्टमंडळासोबत किरीट सोमय्या केंद्रीय गृहसचिव यांच्या भेटीसाठी दिल्लीत पोहोचले आहेत. किरीट सोमय्या केंद्रीय गृहसचिवांची भेट घेणार असून शिवसेनेकडून भाजपा नेत्यांवर होणारे हल्ले, कारवाई यासंबंधी तक्रार करणार आहेत. तसंच केंद्राचं एक विशेष पथक राज्यात पाठवण्याविषयी विनंती करणार आहे.

यावर, राज्यातील कायदा सुव्यवस्थेसंदर्भात काही प्रश्न असतील तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री,, गृहमंत्र्यांना भेटण्यासाठी आले पाहिजे. गेल्या तीन महिन्यात १७ बलात्कार उत्तर प्रदेशात झाले आहेत, त्यासंबंधी कोणी गृहमंत्र्यांना माहिती देत असेल चाग्लेच आहे ना, राष्ट्रपती राजवट लावायची असेल तर उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात एकत्र लावा !

आतापर्यंत गेल्या दोन वर्षात भाजपाचं शिष्टमंडळ दिल्लीत सात वेळा केंद्रीय गृहसचिवांना भेटून आले आहेत. भाजपकडून महाराष्ट्राच्या बदनामीचं षडयंत्र असून ही सगळी ढोंगे सुरु आहेत, हे दोन चार लोक दिल्लीला जातात, पत्रकारांना भेटून महाराष्ट्राची बदनामी करतात, असेच सुरु राहिले तर किरीट सोमय्या सारख्या महाराष्ट्रद्रोही लोकांना लोक चपला मारतीलच अशी टीकाही सोमय्या यांच्या दिल्ली दौऱ्यावर खा. राऊत यांनी केली आहे.

 

Protected Content