अपघातानंतर गाडीने घेतला पेट ; सात जण जिवंत जळाले

fire

 

उन्नाव (वृत्तसंस्था) ट्रकला धडकल्यानंतर गाडीने पेट घेतला आणि या गाडीतून प्रवास करणारे सातही जण गाडीतच अडकल्यामुळे जिवंत जळाल्याची भयंकर घटना आग्रा – लखनऊ एक्सप्रेस वेवर घडली आहे. गाडीत अडकलेले लोक जिवाच्या आकांताने मदतीसाठी याचना करत होते. परंतु, आग एवढ्या वेगाने पसरली की कुणाला काही करण्याची संधीच मिळाली नाही.

रविवारी रात्री आग्रा – लखनऊ एक्सप्रेस वेवर उन्नाव टोल प्लाझाजवळ हा अपघात घडला. हा अपघात इतका भयंकर होता की ट्रकचा पुढचा भाग गाडीमध्ये घुसला होता. गाडीचा चालकही गाडीबाहेर पडण्यात आणि स्वत:ला वाचवण्यात अपयशी ठरला. या आगीत सात जण जिवंत जळाले. गाडीतून प्रवास करणारे सातही जण सफीरपूरचे रहिवासी होते आणि ते शाहजहांपूरमध्ये एका लग्नात सहभागी होण्यासाठी जात होते. ही गाडी अंकित वाजपेयी नामक व्यक्तीची असल्याचे कळते. ही गाडी गाडी अवैधरित्या एलपीजी सिलिंडरवर सुरू असल्याचेही समोर आले आहे. दरम्यान, मृतदेहांची ओळख पटविण्याचे काम अद्यापही सुरु आहे.

Protected Content