अवैधपणे गुरांची वाहतूक करणारे तीन वाहने पकडले; शनीपेठ पोलीसांची कारवाई

जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील ममुराबाद रोड ते भीलपूरा चौक दरम्यानच्या रस्त्यावर अवैधपणे आणि निर्दयतेने गुरांची वाहतूक करणाऱ्या तीन वाहनांवर शनीपेठ पोलीसांनी कारवाई केली असून यामधून १४ गुरांची सुटका करण्यात आली आहे. ही कारवाई मंगळवारी ११ मार्च रोजी सकाळी ७ वाजता करण्यात आले आहे. या संदर्भात दुपारी २ वाजता शनीपेठ पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव शहरांमधून गुरांची अवैधपणे वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती शनिपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाई करण्याबाबतच्या सूचना दिल्या. मंगळवारी ११ मार्च रोजी सकाळी ७ वाजता गुरुनानक नगर परिसरातील ममुराबादरोड ते भीलपुरा चौक दरम्यानच्या रस्त्यावर त्यांनी कारवाई केली असता, यावेळी तीन पिकअप वाहन आढळून आले. शनिपेठ पोलिसांनी तीनही वाहनांची चौकशी केली असता या वाहनांमध्ये निर्दयतेने गुरांची वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार त्यांनी पिकअप वाहन क्रमांक (एमएच १९ बीएम ३१३५), (एमएच १९ एस ६७७०) आणि (एमएच ४३ बी ०४०९) ही तीनही वाहने पोलीसांनी ताब्यात घेतले. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल गिरीश पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वाहन चालक आसीफ मुनव्वर खान सरदार खान कुरेशी (वय-३४), समीर शहा दिलावर शहा (वय-२८), शेख मुबारक शेख अखिल (वय-२०) आणि दगडू आनंदा साळुंखे (वय-४५) सर्व राहणार चोपडा यांच्या विरोधात शनिपेठ पोलीस ठाण्यात दुपारी २ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस नाईक विजय निकम करीत आहे.

Protected Content