मंत्रालय हादरले : आमदारांनी मंत्रालयाच्या संरक्षण जाळीवर मारल्या उड्या !

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । आदिवासी समाज बांधवांच्या मागण्या सोडविण्यासाठी सत्ताधारी पक्षात असलेले आणि विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी सीताराम झिरवळ आंदोलन करत आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री यांची भेट घेतली, परंतू ही भेट निष्पळ ठरल्याने झिरवळ यांनी इतर दोन आमदारांनी मंत्रालयातील संरक्षण जाळीवर उड्या मारल्या. त्यांची एसटीच्या आरक्षणास धक्का लागू नये ही मुळ मागणी आहे. या घटनेमुळे मंत्रालय परिसरात खळबळ उडाली आहे.

आदिवासी समाज बांधवांच्या प्रलंबित मागण्यांसाठी नरहरी झिरवळ हे आंदोलन करत आहे. त्यांनी आदिवासी बांधवांच्या न्याय व हक्कांसाठीचे प्रलंबित असलेले प्रश्नांबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. परंतू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आमचे ऐकत नसतील तर आपल्याकडे प्लॅन बी आहे असे सांगितले. त्या प्लॅन (बी) नुसार नरहरी झिरवळ यांच्यासह इतर दोन आमदारांनी संरक्षक जाळीवर उडी मारल्या. त्यानंतर नरहरी झिरवळ यांची प्रकृती बिघडली. त्यांचा रक्तदाब वाढला आहे. आदिवासी समाजातील आमदार आणि खासदारांनी मंत्रालयात ठिय्या मांडला आहे. त्यात किरण लहामटे, हेमंत सावरा, काशीराम कोतकर यांचा समावेश असल्याचे समोर आले आहे.

Protected Content