वाचा ! राज्य मंत्रिमंडळातील घेण्यात आलेले निर्णय

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत विविध विभागातील महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. मंत्रालयातील मंत्रिमंडळ सभागृहात झालेल्या या बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेसह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते. या बैठकीत १२ विविध निर्णय घेण्यात आले. ते निर्णय पुढीलप्रमाणे आहे.

1.शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर सिंचन. महत्वाकांक्षी वैनगंगा – नळगंगा नदीजोड प्रकल्पास मान्यता. पावणे चार लाख हेक्टर क्षेत्राचे सिंचन होणार.
2.आता प्रकल्पबाधितांना सदनिका मिळणार,धोरणास मान्यता देण्यात आली आहे.
3.लहान शहरांतील पायाभूत सुविधांना वेग येणार,कर्ज उभारण्यास मान्यता देण्यात आली.
4.आदिवासी विभागातील प्राथमिक शिक्षकांना शिक्षण पात्रता परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी दोन वर्षे मुदतवाढ.
5.अनुसूचित जाती जमातीच्या जात, वैधता प्रमाणपत्र मिळण्यातल्य अडचणी दूर होणार अधिनियमात सुधारणा करण्याचा निर्णय.
6.विना परवानगी झाड तोडल्यास आता ५०हजारांचा दंड ठोठावला जाणार.
7. महाराष्ट्र लॉजिस्टिक धोरण राबविणार. पाच वर्षात ३० हजार कोटींचे उत्पन्न मिळणार आहे.
8.कागल येथे आयुर्वेद महाविद्यालय,आजरा तालुक्यात योग व निसर्गोपचार महाविद्यालय
9.न्यायमूर्ती, मुख्य न्यायमूर्तीना सेवा निवृत्तीनंतर घरकामगार, वाहनचालक सेवा
10.सेना कल्याण शैक्षणिक संस्था आणि राधा कल्याणदास दर्यानानी चॅरिटेबल ट्रस्टला मुद्रांक शुल्कात १०० टक्के सूट
11.जुन्नरच्या श्री. कुकडेश्वर आदिवासी हिरडा औद्योगिक सहकारी संस्थेस अर्थसहाय
12.९ ऑगस्टपासून राज्यात हर घर तिरंगा अभियान मोठ्या प्रमाणावर राबविणार अडीच कोटी घरांवर तिरंगा फडकविणार.

Protected Content