एनडीए आजच सरकार स्थापनेचा दावा करणार; बैठकीत झाला निर्णय

नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | लोकसभा निवडणुकीनंतर सरकार स्थापनेचे प्रयत्न सुरू झाले आहेत. एनडीए आजच सरकार स्थापनेचा दावा करू शकते. यासाठी सर्व एनडीए पक्षांचे नेते संध्याकाळी 7.45 वाजता राष्ट्रपती भवनात पोहोचतील. एनडीएच्या पहिल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, पंतप्रधान मोदींनी राजीनामा दिल्यानंतर आणि मंत्रिमंडळ बरखास्त करण्याची शिफारस केल्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी लोकसभा विसर्जित केली.

पंतप्रधान निवासस्थानी एनडीएची बैठक सुमारे 10 हून अधिक पक्षांचे नेते उपस्थित होते. यामध्ये जेडीयू नेते आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, टीडीपी प्रमुख चंद्राबाबू नायडू, आजसू प्रमुख सुदेश महतो, आरएलडीचे जयंत चौधरी, जनसेना पक्षाचे प्रमुख पवन कल्याण, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, एलजेपी (रामविलास) नेते चिराग पासवान, अपना दल. (सोनेलाल) नेत्या अनुप्रिया पटेल आणि हम नेते जीतन राम मांझी यांचा समावेश आहे. एनडीएच्या मित्रपक्षांनी मंत्रालयांची यादी सादर केली, टीडीपीने 6 मंत्रालये आणि सभापतीपद मागितले.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, टीडीपीने 6 मंत्रालयांसह सभापतीपदाची मागणी केली. त्याचबरोबर जेडीयूने 3, चिरागने 2 (एक कॅबिनेट, एक स्वतंत्र प्रभार), मांझीने एक, शिंदे यांनी 2 (एक कॅबिनेट, एक स्वतंत्र प्रभार) मंत्रिपदांची मागणी केली आहे. त्याचबरोबर निवडणुकीपूर्वी आम्हाला मंत्रीपदाचे आश्वासन देण्यात आले होते, असे जयंत यांनी म्हटले आहे. तसेच अनुप्रिया पटेल यांनाही मंत्रीपद हवे आहे. एनडीए संसदीय पक्षाची बैठक 7 जून रोजी सकाळी 11 वाजता होणार आहे. यामध्ये नरेंद्र मोदी यांची औपचारिकपणे नेतेपदी निवड होणार आहे. यानंतर 8 जून रोजी मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत.

Protected Content