विधानसभा निवडणूकीत मनसे २०० पेक्षा जास्त जागा लढवणार – प्रकाश महाजन

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राज ठाकरेंनी परवा आमच्या मेळाव्यात जाहीर केले की आपण २०० ते २२५ जागा लढवू. हा निर्णय जर साहेबांनी घेतला असले तर आम्ही कार्यकर्ते त्या दृष्टीने तयार आहोत. जातीनिहाय आरक्षणाला माझ्या पक्षाचा विरोध आहे. आमचे मत आहे की, जातीपेक्षा आर्थिक निकषांवर आरक्षण असावे. आरक्षणाचा प्रश्न सामोपचाराने सुटेल. सत्तेतील आणि विरोधातील लोकांना आरक्षण मान्य आहे, तर अडले कुठे असा सवालही प्रकाश महाजन यांनी केला आहे.

आम्ही मराठवाड्यातले आहेत. आमच्याकडे कासीम रिझवी नावाचा रझाकार होता. महाराष्ट्रातील मुस्लीमांचे हे कासीम रिझवी होते. उद्धव ठाकरेंना मुस्लिमांबाबत खूप प्रेम आहे आणि मुस्लिमांनाही उद्धव ठाकरेंविषयी प्रेम आहे. त्यांचे प्रेम फक्त उद्धव ठाकरे मोदींना विरोध करतात म्हणून आहे असेही प्रकाश महाजन यांनी सांगितले. राज ठाकरेंनी लोकसभा निवडणुकीत महायुतीला पाठिंबा दिला होता. मात्र, लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुती अपयशी ठरली होती. विधानसभा निवडणुकीत मनसे स्वबळावर लढण्याची शक्यता आहे. मनसेने विधानसभेसाठी २००-२२५ जागांची तयारी करायला सुरुवात केलेली आहे. चाचपणी केलेल्या नेत्यांकडून मनसे अध्यक्ष राज ठाकरे प्रत्येक मतदारसंघाचा आजपासून पुढील काही दिवस आढावा घेणार आहेत.

मनसे स्वबळावर लढणार या चर्चेबरोबरच ते महायुतीत जाणा-याबाबत देखील चर्चा आहे. मात्र २०१४ आणि २०१९ विधानसभेसाठी मनसेला भाजप आणि काँग्रेस आघाडीने टाळी दिली होती. मात्र, अखेरच्या क्षणी पाठिंबा दिल्याने मनसेला मोठा फटका बसला. त्यामुळे या निवडणुकीत ती चूक पुन्हा मनसे करणार नसल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, राज ठाकरे यांच्या स्वबळावर लढण्याच्या भूमिकेमुळे महायुतीला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांच्या सभेमुळे महायुतीला काही जागांवर फायदा झाल्याचे अनेकांचे म्हणणे होते. मात्र, राज ठाकरेंच्या स्वबळावर लढण्यामुळे भूमिकेमुळे महायुतीचे नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

 

Protected Content