जे नेते पक्षाला मजबूत करतील त्यांना परत घेतले जाईल – शरद पवार

पुणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला मोठा धक्का बसला. सुनिल तडकरेंच्या रुपात त्यांचा केवळ एक खासदार निवडून आला. याउलट महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने मोठी बाजी मारताना १० जागा लढवत ८ जागांवर विजय मिळवला. यानंतर आता अजित पवार गटात चलबिचल सुरु असून अनेक आमदार पुन्हा शरद पवार गटात परतण्यास इच्छुक असल्याची चर्चा सुरू आहे.याबाबत विचारले असता शरद पवारांनी सकारात्मक प्रतिक्रिया देत येणाऱ्यांसाठी पक्षाचे दरवाजे खुले असल्याचे संकेत दिले.

पुतण्या अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या आमदारांसाठी पक्षाची दारे खुली असल्याचे संकेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी दिले. जे आमदार संघटना बळकट करण्यास मदत करतील किंवा पक्षाच्या प्रतिमेला धक्का पोहोचवणार नाहीत, अशा आमदारांना पक्षात घेतले जाईल, असे राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्याने प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. ज्यांना पक्ष कमकुवत करायचा आहे, त्यांना घेतले जाणार नाही. पण जे नेते संघटना बळकट करण्यास मदत करतील आणि पक्षाच्या प्रतिमेला धक्का पोहोचवणार नाहीत, अशा नेत्यांना घेतले जाईल, असे पवार म्हणाले. मात्र, तेही पक्षाच्या (राष्ट्रवादी-सपा) नेत्यांशी आणि कार्यकर्त्यांशी चर्चा करून होईल, असेही ते म्हणाले. शरद पवार यांनी आपले पुतणे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुन्हा राष्ट्रवादीत स्वागत केले जाणार नाही, असे स्पष्ट केले. अजित दादांचा गट सध्या सत्ताधारी महायुतीसोबत आहे, ज्यात भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा समावेश आहे.

Protected Content