जे.ई. स्कूलमध्ये जुन्या आठवणींना उजाळा देत रंगला माजी विद्यार्थ्यांचा मेळावा !

मुक्ताईनगर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । सोशल मीडियाच्या माध्यमातून एकत्र आलेल्या जे ई स्कूलच्या ज्यु कालेजचे १९९३ -९४ व १९९४-९५ च्या बॅच चे माजी विद्यार्थ्यां यांनी व्हाट्सअप ग्रुप वर गेट-टु गेदर ची संकल्पना मांडली आणि त्याला सर्वांनी सकारात्मक प्रतिसाद देत गेट-टु गेदरची संकल्पना प्रत्यक्षात खरी करुन दाखवली. यावेळी माजी विद्या

मलकापूर हावेला लागून असलेल्या पद्मश्री लॉन्समध्ये हा गेट-टु गेदरचा कार्यक्रम नुकताच पार पडला. याप्रसंगी जे.ई. स्कुलचे प्राचार्य आर.पी. पाटील, उपशिक्षक एस.पी. राठोड, संजय ठाकूर व खास करून कार्यक्रमासाठी कल्याण येथून आलेले प्रकाश इंगळे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी प्राचार्य आर.पी. पाटील यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन राखी बोथ्रा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच एस.पी. राठोड व संजय ठाकूर यांचा सत्कार शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन अनुक्रमे ममता कोळंबे व मनीषा देशमुख यांच्याहस्ते करण्यात आला. शाळे प्रती आदरभाव व्यक्त करण्यासाठी व शाळेच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी विद्यार्थ्यांनी संस्थेच्या निमखेडी येथील शाळेच्या ग्रंथालयाला उपशिक्षक अनिल चव्हाण यांच्याकडे पुस्तके सुपूर्त केली. कार्यक्रमाला संबोधित करताना प्राचार्य आर.पी. पाटील यांनी विद्यार्थ्यांचे मन भरून कौतुक केले.

शाळेबद्दल आणि शिक्षकांबद्दल आजही तुमच्या मनात असलेला आदर आणि ऋणानुबंधाची भावना बघून त्यांनी समाधान व्यक्त केले. भविष्यात अशा प्रकारचे गेट-टु गेदर चे कार्यक्रम घेवून शिक्षक आणि शाळा यांचे विद्यार्थ्यांशी असलेले नाते घट्ट होण्यासाठी अशा कार्यक्रमाचे आयोजन पुन्हा पुन्हा करावे असे भावनिक आवाहन त्यांनी केले.आमच्यासारख्या शिक्षकांना आपण कार्यक्रमाला बोलावून मानसन्मान दिला व सत्कार केला त्याबद्दल विद्यार्थ्यांचे आभार मानले. संजय ठाकूर यांनी ही आपले मनोगत व्यक्त केले. शाळेचे आपण माजी विद्यार्थी आहोत. शाळे मुळेच आपण घडलो. शाळेने आपल्यावर संस्कार केले. शिक्षकांनी आपल्याला घडवले त्यामुळे शाळे प्रती काहीतरी आपण देणे लागतो या उदात्त भावनेतून कल्याण येथून आलेली माजी विद्यार्थिनी आशा ठाकूर हिणे विद्यालयाला दोन माईक भेट दिले. याप्रसंगी सभागृहातील वातावरण भावनिक झाले होते. आज ही समाजात शाळे विषयी व शिक्षकांविषयी आदर, मान- सन्मान असल्याचा सूर विद्यार्थ्यांमधून व्यक्त झाला.

२९ वर्षानंतर आपल्या मित्र-मैत्रिणींना भेटत असल्याचा आनंद सर्वांच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होता. सुरुवातीला सर्वांनी आपापला परिचय करून दिला. त्यानंतर खांन्देशातील प्रसिद्ध अश्या दाळ -बट्टीच्या सुरुची भोजनावर सर्वांनी मनसोक्त ताव मारला. विविध खेळ, संगीत खुर्ची, अंताक्षरी, या सारख्या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांनी मनमुराद आनंद लुटला. विविध गाण्यावर डान्स करतांना विद्यार्थ्यांच्या आनंदाला उधाण आले होते. विजू खैरनार व आशा ठाकूर यांनी आपल्या गोड आवाजात बहारदार गीते सादर करून कार्यक्रमात रंगत भरली होती. संजय सूर्यवंशी व नितीन भालेराव यांनी केलेल्या सूत्रसंचालनातून हास्याचे फवारे उडत होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संजय सूर्यवंशी, गजू वंजारी, छोटू भोई, जितु पाटील, भास्कर कोळी, गणेश गलवाडे, अनिल चव्हाण, मनोज ठाकूर, आशा ठाकूर, दुर्गा ठाकूर, मनीषा देशमुख, अनिता कोळी, कल्पना कोळी यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाला मुंबई, पनवेल, कल्याण, नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार, बुलढाणा, अमरावती, नागपूर, पुणे येथून विद्यार्थी आले होते.

Protected Content