काँग्रेस सरकार आल्यास ३००० हजार रूपयांची महालक्ष्मी योजना आणू – नाना पटोले

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राज्यामध्ये काँग्रेस सरकार आल्यास लाडकी बहीण योजनेला तोडीस तोड अशी महालक्ष्मी योजना महिलांसाठी आणू. यात तर महिन्याला महिलांना तीन हजार रुपये देण्यात येतील आणि प्रत्येक वर्षाला त्यात हजार रुपयांची वाढ करू, अशी घोषणा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यांनी केली आहे. आम्ही लाडकी बहीण योजनेचे स्वागतच केले आहे. मात्र ती योजना कायम राहावी, भगिनींची दिशाभूल होऊ नये, बँकेत पैसे गेले ते बँक वाल्यांनी गायब केले, असे होऊ नये, असे म्हणत नाना पटोले यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले.

काँग्रेसचे सरकार आल्यास आम्ही या पेक्षा चांगली योजना आणणार असल्याचा दावा पटोले यांनी केला आहे. महालक्ष्मी योजनेच्या नावाने ही योजना आणणार असून त्यामध्ये मात्र महिलांना तीन हजार रुपये देण्यात येणार आहे. तसेच त्यात दर व्रषी एक हजार रुपयांची वाढ करणार असल्याचे देखील नाना पटोले यांनी म्हटले आहे. एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमांमध्ये नाना पटोले यांनी काँग्रेसच्या वतीने या नव्या योजनेची घोषणा केली आहे. इतकेच नाही तर आमच्या सरकारच्या या योजनेमध्ये दरवर्षी एक हजार रुपयांची वाढ करणार असल्याची घोषणा देखील नाना पटोले यांनी केली आहे.

Protected Content