दोन लाखांसाठी विवाहितेचा छळ; रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल

जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | विवेकानंद नगर येथील माहेर असलेल्या विवाहितेला २ लाख रुपये आणावे अशी मागणी करत सासरी छळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत विवाहितेने पोलिसात तक्रार दिली असून त्यानुसार पतीसह चार जणांविरुद्ध रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील विवेकानंद नगरातील माहेर असलेल्या मनिषा निलेश बाविस्कर यांचा विवाह पाचोरा येथील निलेश वसंतराव बाविस्कर यांच्यासोबत झाला आहे. लग्नात हुंडा कमी दिला, तसेच विवाहितेच्या पतीला कामावर लावण्यासाठी माहेरुन दोन लाख रुपये आणावे. यासाठी सासरच्यांकडून विवाहितेचा छळ केला जात होता. विवाहितेने मागणी नाकारल्यामुळे विवाहितेला चापटा बुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यात आली. तसेच त्यांच्या आई, वडील व भावाला शिवीगाळ करीत जीवेठार मारण्याची धमकी दिली. हा छळ असह्य झाल्याने विवाहिता आपल्या माहेरी निघून आल्या. अखेर त्यांनी रविवार १४ जुलै रोजी सकाळी ११ वाजता रामानंद नगर पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार विवाहितेचा पती निलेश वसंतराव बाविस्कर, सासरे वसंतराव भास्करराव बाविस्कर, सासू उषाबाई वसंतराव बाविस्कर, अजल सासरे छबीलदास रामदास ठाकरे सर्व रा. पाचोरा यांच्याविरुद्ध रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ शरद वंजारी हे करीत आहे.

Protected Content