बंधाऱ्यात बुडून चौघा भावंडांचा मृत्यू

चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील पिंपरखेड येथील चौघा भावंडांचा केटीवेअर बंधाऱ्यात बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे.

या संदर्भातील माहिती अशी की, सुभानिय आर्य हे मध्यप्रदेशातील सेंधवा जिल्ह्यातील मूळ रहिवासी असून मजुरीसाठी सुमारे एक वर्षापासून पिंपरखेड येथे आपल्या कुटुंबासह वास्तव्याला होते. ते सालदार म्हणून काम करत असलेल्या शेतकऱ्याच्या शेताला लागूनच केटीवेअर बंधारा आहे. रविवारी सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास त्यांची मुलगी ही कपडे धुण्यासाठी बंधाऱ्याच्या दिशेने गेली. तिच्या पाठोपाठ त्यांनी अन्य मुलेदेखील गेली. काही वेळात या सर्वांना बंधाऱ्यात गटांगळ्या खातांना त्यांच्या मोठ्या मुलीने पाहिले. आरडा-ओरड करून तिने वडलांना बोलावले. मात्र तोवर चौघांचा बुडून मृत्यू झाला होता.

या दुर्घटनेत रोशनी आर्य ( वय 9); शिवांजली आर्य (वय 6); आर्यन आर्य (वय 5) आणि आराध्या आर्य (वय 4) या चौघा भावंडांचा बंधाऱ्यात बुडून मृत्यू झाला. या दुर्घटनेमुळे परिसरावर शोककळा पसरली आहे. तर चौघा लेकरांचा एकचदा करूण मृत्यू झाल्याने सुभानिय आर्य यांच्या कुटुंबावर वज्राघात झाला आहे.

चाळीसगावच्या ग्रामीण रूग्णालयात या भावंडांचे शवविच्छेदन करण्यात आले असून त्यांच्यावर अतिशय शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

Protected Content