मुंबई बॉम्बस्फोटातील चार आरोपीना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा |   मुंबई बॉम्बस्फोटातील चार आरोपींना गुजरात एटीएसने ताब्यात घेतले होते. या आरोपींना आज न्यायालयात हजर करण्यात आले. या आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली असून सुनावणीनंतर गुजरात एटीएसकडून सीबीआयच्या ताब्यात देण्यात आले.

मुंबईत १९९३ मध्ये १२ ठिकाणी साखळी बॉम्बस्फोट झाले होते.  २९ वर्षांपासून वॉन्टेड असलेल्या या चार आरोपींचा मुंबई पोलीस, सीबीआय आणि गुजरात एटीएससह जगातील अनेक सुरक्षा यंत्रणा शोध घेत होत्या. या चारही आरोपींविरुद्ध इंटरपोल आणि रेड कॉर्नर नोटीस देखील प्रसिद्ध करण्यात आली होती. गेल्याच आठवड्यात अहमदाबादमधून गुजरात एटीएसने पकडले. सोमवारी या आरोपींची न्यायालयात सुनावणी होऊन या चारही आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली असून गुजरात एटीएसने हे प्रकरण सीबीआयकडे वर्ग केले आहे.

मुंबईत एकापाठोपाठ १२ साखळी बॉम्बस्फोटात अनेक निरपराधांचा मृत्यू तर ७०० पेक्षा अधिक नागरिक जखमी झाले होते. मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणी १८९ संशयितांविरुद्ध आरोपपत्र सादर करण्यात येऊन २००६ मध्ये १०० आरोपींना दोषी ठरविण्यात आले आहे. तब्बल २९ वर्षानंतर या गुन्ह्यातील या चार जणांना अहमदाबाद येथून गुजरात एटीएसच्या पथकाने अटक केली. आज न्यायालयीन सुनावणीनंतर गुजरात एटीएसकडून सीबीआयच्या ताब्यात देण्यात आले.

Protected Content