विजेच्या धक्क्याने शेतकऱ्यांचा शेतात मृत्यू

धरणगाव- लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । विहिरीतील ईलेक्टीक मोटार सुरू करतांना वीजेच्या धक्क्याने शेतकऱ्याचा दुदैवी मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी २७ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता धरणगाव तालुक्यातील वराड शिवारात घडली आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. बाळू बाबुराव भिल वय ५५ रा. वराड ता.धरणगाव असे मयत झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.

मिळालेली अधिक माहिती अशी की, धरणगाव तालुक्यातील वराड गावात बाळू भिल हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. शेती करून ते आपला उदरनिर्वाह करत होते. त्याचे वराड शिवारात शेत आहे. मंगळवारी २७ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता कांद्याच्या रोपांना पाणी देण्यासाठी त्यांच्या विहीरीतील ईलेक्ट्रीक मोटार सुरू करण्यासाठी गेले. त्यावेळी त्यांना विजेचा जोरदार धक्का लागल्याने ते बेशुध्द झाले. त्यांना तातडीने धरणगाव ग्रामीण रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. याबाबत धरणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ अर्जून कुवारे हे करीत आहे.

Protected Content