जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | नंदुरबारहून जळगावला येत असलेल्या दोन मित्रांना जळगाव रेल्वे स्टेशन जवळ रेल्वेने दिलेल्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दुसरा मित्र गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी 1 डिसेंबर रोजी दुपारी १.३० वाजता घडली. याप्रकरणी रेल्वे पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

ओम विजय वाघेला ( वय २३, अहमदाबाद) असे मृत झालेल्या युवकाचे नाव आहे. समर्थ रघुवंशी ( वय २२,रा. नंदुरबार) हा गंभीर जखमी झाला आहे.

या संदर्भात अधिक माहिती अशी की, ओम वाघेला आणि त्याचा मित्र समर्थ रघुवंशी हे जळगावला फिरण्यासाठी नंदुरबार येथून रविवारी 1 डिसेंबर रोजी जळगाव येथे रेल्वेने आले होते. दुपारी दीड वाजेच्या सुमारास जळगाव रेल्वे स्थानकाजवळ डाऊन रेल्वे लाईन वरील तुलसी एक्सप्रेसने ओम वाघेला आणि समर्थ रघुवंशी या दोघांना धडक दिली या धडकेत ओम वाघेला या तरुणाचा जागी मृत्यू झाला तर त्याच्या सोबत असलेला समर्थ रघुवंशी हा तरुण गंभीर जखमी झाला ची घटना घडली आहे.
या घटनेची माहिती ऑन ड्युटी स्टेशन मास्तर यांनी कळविल्यानुसार रेल्वे पोलीस कर्मचारी सचिन भावसार व रविंद्र पाटील यानी अपघातातील दोघांना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उपचारासाठी दाखल केले. यावेळी वैद्यकीय अधिकारी यांनी ओम वाघेला याला मृत घोषित केले तर जखमी झालेला समर्थ रघुवंशी याला उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


