कोरोना : घरी पायी जाणारे पाच मजुर अज्ञात वाहनाच्या धडकेत ठार

विरार (वृत्तसंस्था) देशभरात कोरोनामुळे लॉकडाऊनमुळे सार्वजनिक वाहतूक बंद आहे. अशा परीस्थित मजूर पायीच घर गाठत आहे. अशाच पद्धतीने घरी पायी जाणाऱ्या पाच मजुरांचा अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत मृत्यू झाला आहे.

 

कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे मजुरांना काम नाही. तशात लॉकडाऊनमुळे सार्वजनिक वाहतूक बंद असल्यामुळे जीव धोक्यात घालून मजूर पायीच जीव धोक्यात घालून घरी जात आहे. मुंबई-अहमदाबाद महामार्गावर विरारजवळ आज (ता.२८) मांडवी येथे येथे झालेल्या अपघातात पाच मजुर अज्ञात वाहनाच्या धडकेत ठार झाले आहेत.

Protected Content