सरपंचच नव्हे मुख्यमंत्रीही थेट जनतेतून निवडायला हवा: अण्णा हजारे

anna hazare 2017088719

 

अहमदनगर (वृत्तसंस्था) ‘फक्त गावचे सरपंचच नव्हे तर, राज्याचे मुख्यमंत्रीही थेट जनतेतून निवडून दिले पाहिजेत, असे मत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी देखील मत व्यक्त केले आहे.

 

अण्णा हजारे यांनी म्हटले आहे की, निवडून दिलेल्या सदस्यांनीच सरपंच निवडावा हे खरे विकेंद्रीकरण नव्हे. मतदारांच्या हाती अधिकार असावेत. अन्यथा पक्ष आणि पार्टीशाही होईल. ती पद्धती लोकशाहीला मारक ठरेल. त्यामुळे खऱ्या लोकशाहीसाठी सरपंच गावांनीच निवडावा. एवढेच नाही तर राज्याचे मुख्यमंत्री सुद्धा मतदारांनी निवडून पाठवले पाहिजेत. दरम्यान, देवेंद्र फडणवीस सरकारने ग्रामपंचायत सदस्यांमधून सरपंच निवडून देण्याची पद्धत बंद करून थेट जनतेतून सरपंच निवडण्याची पद्धत सुरू केली होती. ही पद्धत बदलून पुन्हा ग्रामपंचायत सदस्यांमधून सरपंच निवडण्याचा निर्णय महाविकास आघाडीने घेतला आहे. यावरून सध्या वाद सुरु आहे.

Protected Content