Home Cities जळगाव कृषी निविष्ठा विक्रेत्यांचा उद्या विक्री केंद्र बंदचा निर्णय

कृषी निविष्ठा विक्रेत्यांचा उद्या विक्री केंद्र बंदचा निर्णय


जळगाव –लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । राज्यातील कृषी निविष्ठा विक्रेत्यांनी राज्याच्या कृषी विभागाच्या साथी पोर्टल २ च्या अंमलबजावणीवर तीव्र विरोध दर्शवला आहे. विक्रेत्यांच्या सांगण्यानुसार, या पोर्टलद्वारे बियाणे विक्री करणे शेतकऱ्यांना दिलासा देण्याऐवजी त्यांना अधिक अडचणीत टाकू शकते. या विरोधातून राज्यातील सर्व ३४ जिल्ह्यांतील कृषी निविष्ठा विक्रेते २८ ऑक्टोबर २०२५ रोजी एक दिवस विक्री केंद्रे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

साथी पोर्टल २ च्या अंमलबजावणीसाठी कृषी विभागाने एक वर्षापूर्वीच सूचना दिल्या होत्या, ज्यामध्ये विक्रेत्यांना शेतकऱ्यांना बियाणे विक्रीसाठी ऑनलाइन पोर्टल वापरण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र, या पोर्टलच्या वापराबाबत अनेक अडचणी आहेत, विशेषत: राज्यातील दुर्गम आणि अतिदुर्गम भागांतील विक्रेत्यांसाठी. याठिकाणी संगणक, प्रिंटर आणि स्कॅनरसारख्या अत्यावश्यक साधनांचा अभाव आहे. तसेच, कृषी हंगामाच्या सुरुवातीच्या काळात विक्रेत्यांवर मोठा दबाव असतो, ज्यामुळे अनेक उत्पादने एकाच वेळी विक्री करणे आवश्यक ठरते. अशा परिस्थितीत, साथी पोर्टल २ चा वापर शेतकऱ्यांसाठी आणि विक्रेत्यांसाठी व्यावहारिकदृष्ट्या अशक्य ठरतो.

विक्रेते तसेच कृषी विभागाने या संदर्भात कोणतेही प्रशिक्षण किंवा प्रात्यक्षिके आयोजित केली नाहीत, ज्यामुळे विक्रेत्यांना पोर्टलचा वापर शिकता येईल. यामुळे विक्रेत्यांच्या कामात अधिक गोंधळ होऊ शकतो. तसच, कृषी विभागाने या पोर्टलच्या वापराबाबत कोणत्याही प्रकारच्या समुपदेशनाची कार्यवाही केली नाही. काही जिल्हा व तालुका अधिकाऱ्यांकडून विक्रेत्यांना नोटीसा देण्यात आल्या आहेत आणि विक्री परवाना निलंबित करण्याची धमकी दिली जात आहे, ज्यामुळे विक्रेत्यांमध्ये असंतोष वाढला आहे.

कृषी विभागाचे उद्दिष्ट शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण बियाणे मिळवून देणे हे निश्चितच महत्त्वाचे आहे, मात्र विक्रेत्यांना अडचणीत आणणारे साथी पोर्टल २ चे आदेश, शेतकऱ्यांच्या हिताचे गमावू शकतात. विक्रेत्यांनी साथी पोर्टल २ च्या अंमलबजावणीस स्थगिती देण्याची मागणी केली आहे. राज्यातील माफदा संघटनेच्या वतीने, राज्याच्या कृषी विभागाला या अडचणींची माहिती दिली गेली आहे.

दुसरीकडे, राज्यातील सर्व विक्रेत्यांनी २८ ऑक्टोबर रोजी विक्री केंद्रे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे शेतकऱ्यांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी विक्रेत्यांनी साथी पोर्टल २ ची अंमलबजावणी स्थगित करावी अशी मागणी केली आहे. या आंदोलनाद्वारे विक्रेत्यांचे लक्ष राज्याच्या कृषी विभागाकडे वेधले जाईल. विक्रेत्यांनी या आंदोलनाची घोषणा करताना बंद केंद्रे याबाबत बोर्ड लावण्याचा निर्णय घेतला आहे.

पत्रकार परिषदेला विनोद तराळ पाटील अध्यक्ष मापदा, राजेंद्र पाटील संचालक,  कैलास मालू सचिव माफदा व जळगाव जिल्हा संघटना शैलेश काबरा खजिनदार जळगाव यांची उपस्थिती होती.


Protected Content

Play sound