मुंबईने रेस्ट ऑफ इंडियाचा पराभव करून जिंकली इराणी ट्रॉफी

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | भारतीय देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वात यशस्वी संघ असलेल्या मुंबईने २७ वर्षांनी इराणी ट्रॉफी २०२४ चे विजेतेपद पटकावले आहे. ही स्पर्धा रणजी करंडक विजेता मुंबई आणि रेस्ट ऑफ इंडिया यांच्यात खेळली गेली. दोन्ही संघांतील हा सामना अनिर्णित राहिला आणि पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर मुंबईला विजयी घोषित करण्यात आले. १९९७ नंतर प्रथमच मुंबईने इराणी चषकाचे विजेतेपद पटकावण्यात यश मिळवले आहे.

मुंबईने इराणी चषकाचे विजेतेपद पटकावण्याची ही १५ वी वेळ आहे. पाचव्या दिवशी आठव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्लाय तनुष कोटियनने शतकी खेळी साकारली. तत्पूर्वी पहिल्या डावात सर्फराझ खानच्या द्विशतकाच्या जोरावर मुंबईने ५३७ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात अभिमन्यू ईसवरनच्या १९१ धावांच्या खेळीनंतरही रेस्ट ऑफ इंडिया ४१६ धावाच करता आल्या. ज्यामुळे मुंबईला १२१ धावांची आघाडी मिळाली होती. या सामन्यात मुंबईने प्रथम फलंदाजी केली. मुंबईने पहिल्या डावात ५३७ धावा केल्या होत्या, तर रेस्ट ऑफ इंडिया ४१६ धावा करण्यात यशस्वी ठरला.

तनुष कोटियनने दुसऱ्या डावात आठव्या क्रमांकावर फलंदाजी करताना शतक झळकावले. त्याने १५० चेंडूत ११४ धावा केल्या, ज्यात १० चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. त्याच्याशिवाय मोहित अवस्थीने ५१ धावांचे योगदान दिले. मुंबईने ३२९ धावांवर आपला दुसरा डाव घोषित केला. टीम इंडियातून बाहेर असलेल्या अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली मुंबई संघाने अगोदर रणजी चषक आणि आता इराणी चषक उंचावला आहे.

Protected Content