मंत्री विजयकुमार गावितांच्या हस्ते गृहपयोगी वस्तूंचे वाटप

नंदूरबार-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राज्य शासनाचे महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ राज्यातील कामगारांच्या आर्थिक तसेच सामाजिक विकासासाठी सतत प्रयत्नशील असते आणि त्यासाठी मंडळ वेळोवेळी विविध योजनांची सुरुवात करत असते. कामगारांनी आपल्यासाठी उपयुक्त अशा योजनेचा अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन आज शहादा येथे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी केले आहे. ते आज शहादा व सारंगखेडा येथे महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने आयोजित अत्यावश्यक सुरक्षा संच व गृहपयोगी वस्तुंच्या वितरण प्रसंगी बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या कृषी सभापती हेमलता शितोळे, शेखर पाटील, शशिकांत पाटील, राजेंद्र गोसावी आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना मंत्री डॉ. गावित म्हणाले, राज्यातील बांधकाम क्षेत्रात काम करणारे कामगार हे आर्थिकदृष्ट्या गरीब असतात तसेच ते कमी वेतनात काम करत असतात त्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती कमकुवत असते व आर्थिक स्थिती गरीब असल्याकारणामुळे त्यांना त्यांचा विवाह करण्यासाठी लागणार खर्च परवडण्यासारखा नसतो व त्यामुळे त्यांना स्वतःचा विवाह करण्यासाठी लागणाऱ्या पैशांसाठी खूप साऱ्या समस्यांचा सामना करावा लागतो तसेच त्यांना विवाहासाठी आवश्यक पैशांसाठी इतरांवर अवलंबून रहावे लागते तसेच त्यांना जास्त व्याज दराने कर्ज घ्यावे लागते त्यामुळे राज्यातील कामगारांच्या या सर्व समस्यांचा विचार करून राज्य शासनाच्या कामगार विभागाने नोंदीत कामगाराच्या पहिल्या विवाहाच्या खर्चाच्या प्रतिपूर्तीसाठी आर्थिक सहाय्य देण्यात येते. तसेच आर्थिक दृष्ट्या गरीब कामगाराला पत्नीच्या प्रसूतीदरम्यान हॉस्पिटल चा खर्च करणे शक्य नसते व त्याला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे कामगार मंडळामार्फत कामगाराच्या पत्नीस नैसर्गिक प्रसूतीसाठी आर्थिक सहाय्य दिले जाते.

यावेळी बोलताना ते म्हणाले, बहुतांश स्वतःचे उच्च शिक्षण परदेशात पूर्ण करण्यासाठी उत्सुक असतात परंतु बांधकाम क्षेत्र तसेच इतर क्षेत्रात काम करणारे कामगार हे आर्थिक दृष्ट्या गरीब असल्याकारणामुळे त्यांची मिळकत कमी असते आणि त्यामुळे ते आपल्या पाल्याना शिक्षणासाठी परदेशात पाठविण्यासाठी असमर्थ असतात त्यामुळे विद्यार्थी परदेशात शिक्षण पूर्ण घेण्यापासून वंचित राहतात त्यामुळे कामगारांच्या या सर्व समस्यांचा विचार करून महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाने कामगारांच्या पाल्यांना परदेश उच्चशिक्षण शिष्यवृत्ती सुरु करण्याचा महत्वाचा निर्णय घेतला आहे. ते पुढे म्हणाले, आपत्कालीन मदत: अपघात, आजार, मृत्यू इत्यादींमुळे होणाऱ्या आर्थिक नुकसानापासून संरक्षण, रुग्णालये, औषधे आणि आरोग्य विमा यांसारख्या आरोग्य सुविधा, कामगारांच्या मुलांसाठी शिष्यवृत्ती आणि शिक्षण सहाय्य,कामगारांसाठी स्वस्त निवास सुविधा, निवृत्तीनंतर नियमित उत्पन्न, कर्ज, प्रशिक्षण, सामाजिक सुरक्षा इत्यादींसारख्या इतर सुविधा या मंडळामार्फत दिल्या जात असल्याचेही यावेळी आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी यावेळी सांगितले. पंचायत समितीचे उपसभापती सुनील पाटील, पंचायत समिती सदस्य विजय पाटील, उद्योजक शशिकांत पाटील, शेखर पाटील, दत्त मंदिर संस्थानचे उपाध्यक्ष रवींद्र पाटील, सामाजिक कार्यकर्ते विजय महाले, विकास सोसायटीचे उपाध्यक्ष शांतीलाल पाटील, राजेंद्र पाटील, देविदास माळी व गणेश पाटील.

Protected Content