कसारा घाटाजवळ कंटेनरने अनेक गाड्यांना दिली धडक; १५ प्रवासी जखमी

नाशिक-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | नाशिक मुंबई महामार्गावर भीषण अपघात झाला असल्याची माहिती समोर येत आहे. नाशिक-मुंबई महामार्गावर कसारा घाटाजवळ एका कंटेनरने अनेक गाड्यांना धडक दिली. या अपघातात जवळपास ६ ते ७ गाड्यांचा चक्काचूर झाला आहे. दरम्यान या अपघातात १० ते १५ जण जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्राथमिक माहितीनुसार कंटेनरचा ब्रेक फेल झाला होता.

कसारा घाटात ब्रेक फेल झालेल्या कंटेनर गाडीने ६ ते ७ वाहनांना जोरदार धडक दिली. या धडकेत गाड्यांचे मोठ्या प्रमाणत नुकसान झाले आहे. या अपघातात १२ ते १५ जण जखमी झाले आहेत. अनेक वाहनांना धडक दिल्यानंतर कंटेनर हा महामार्गालगत असलेल्या नाल्यात जाऊन पलटी झाला. घटनास्थळावर महामार्ग पोलीस केंद्र घोटी, रूट पेट्रोलिंग टीम आणि रुग्णवाहिका आणि जगतगुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानची रुग्णवाहिका रवाना झाली आहे. तर आज रविवारी असल्याने कसारा घाटात वाहनांची रांग लागली आहे. त्यातच हा अपघात झाल्याने वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.

Protected Content