प्रवाशी रिक्षा चोरी करणाऱ्या तिघांना अटक

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जळगाव तालुक्यातील कुसुंबा गावात तरूणाच्या घरासमोर लावलेली प्रवासी रिक्षा चोरुन ती बाहेरगावी विक्री करुन पसार झालेल्या जयेश परदेशी, प्रभात मानकेश्वर, ऋषीकेश बापु चित्ते (तिघे रा. कुसुंबा, ता. जळगाव) या तिघांना बुधवारी १९ जून रोजी सकाळी ८ वाजता गावातून अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरीची रिक्षा हस्तगत केली असून एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक असे की, जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथील दीपक श्रीराम मोरे यांच्या घरासमोर लावलेली त्यांची (एमएच १९, सीडबल्यू २५९९) क्रमांकाची प्रवासी रिक्षा ५ जून रोजी मध्यरात्रीच्या सुमारास चोरी झाली होती. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांनी गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांचे पथक तयार केले होते. दरम्यान, या पथकाकडून या गुन्ह्याचा तपास करीत असतांना ही रिक्षा गावातील जयेश परदेशी याने त्याच्या इतर दोन साथीदारांच्या मदतीने चोरुन तीची बाहेरगावी विक्री केल्याची माहिती पथकाला मिळाली.

त्यानुसार पथकाकडून संशयित जयेश परदेशी याच्यावर पाळत ठेवून होते. परदेशी रिक्षास घेवून गावात आल्याची माहिती मिळताच पथकाने त्याच्या घरातून अटक केली. त्याच्याकडून चोरलेली रिक्षा हस्तगत करण्यात आली. परदेशी याला पोलिसांनी अटक केल्याचे समजताच त्याचे साथीदार हे बाहेरगावी पसार झाले होते. दरम्यान हा १९ जून रोजी सकाळी ८ वाजता पसार झालेल्या प्रभात मानकेश्वर, ऋषीकेश बापु चित्ते या दोघांना देखील अटक केली. त्यांनी ही चोरी परदेशी याच्यासोबत केल्याची कबुली दिली. ही कारवाई पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दीपक जगदाळे, दत्तात्रय पोटे, सफौ अतुल वंजारी, पोहेकॉ गणेश शिरसाळे, किशोर पाटील, योगेश बारी, किरण पाटील, नाना तायडे, शशिकांत मराठे यांच्या पथकाने केली.

Protected Content