भुसावळ (प्रतिनिधी) येथे रेल्वे प्रशासनाने रेल्वे वसाहतींमधील सांडपाणी व नाल्यातून वाहून जाणारे अस्वच्छ पाणी रिसायकलिंग करून त्याचा वापर रेल्वे गाड्या व तसेच प्लॅटफॉर्म धुण्यासाठी करण्याचा नवा प्रयोग अमलात आणला आहे.
या प्लांटमध्ये दर आठ तासात सुमारे १२ लाख लिटर्स पाणी सध्या रिसायकल केले जात आहे. रेल्वे प्रशासनाने भुसावळ विभागात हा पहिला प्रोजेक्ट सुरू केला असुन भविष्यात प्रत्येक रेल्वे स्टेशनवर असा प्रोजेक्ट सुरू करण्याचा रेल्वेचा मानस आहे. सामाजिक आणि पर्यावरणदृष्ट्या हा प्रोजेक्ट अत्यंत उपयुक्त ठरणारा आहे.