जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । येथील वेंकटेश नगरातील रहिवासी सौ. अंजली गोपी सोरडे यांचे गुरुवार, ९ एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ५० वर्ष होते. त्या कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील जनसंवाद आणि पत्रकारिता विभागाचे प्राध्यापक डॉ. गोपी सोरडे यांच्या पत्नी होत. सौ. अंजली सोरडे यांच्या निधनाने सोरडे परिवारावर शोककळा पसरली असून, त्यांच्या पश्चात पती, एक मुलगा, सासू, दीर, भावजय, भाऊ आणि वहिनी असा मोठा परिवार आहे.



