जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । गुढीपाडवा आणि नववर्षाच्या शुभ मुहूर्तावर जळगावमध्ये मथुरा कृष्ण जन्मभूमी मुक्तीसाठी एक महत्वाकांक्षी बैठक उत्साहात पार पडली. मथुरा कृष्ण जन्मभूमी संघर्ष समितीच्या मार्गदर्शनाखाली आणि संत श्री फलहारी बाबा दिनेशजी शर्मा यांच्या प्रेरणेतून आयोजित या बैठकीत उपस्थितांनी महायज्ञासाठी एकजुटीने कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला.
बैठकीचे अध्यक्षस्थान श्री भागवताचार्य सोपान देवजी महाराज आर्वीकर यांनी भूषवले, तर मथुरा कृष्ण जन्मभूमी महाराष्ट्र महामंत्री श्री सुभाष भाऊ चौधरी यांनी प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमाचे स्वागत केले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी 108 कुंडी महायज्ञाच्या आयोजनासंबंधी सविस्तर चर्चा केली आणि आगामी योजनांबाबत ठोस निर्णय घेतले.

बैठकीत दिलीप खडके, संजय ठाकूर, नीलू आबा तायडे, संजय काळे, बंटी भारंबे, चिराग काळे, निलेश कोल्हे, अरुण मराठे, धनंजय पाटील, बाळकृष्ण महाराज आर्वीकर आणि राधेश्याम महाराज पवार (लाल माती) यांची प्रमुख उपस्थिती लाभली. या उपक्रमासाठी सर्व उपस्थितांनी आपापल्या जबाबदाऱ्या स्विकारल्या आणि महायज्ञाला यशस्वी करण्यासाठी सामूहिक प्रयत्न करण्याचे ठाम आश्वासन दिले.
बैठकीचे आयोजन बंटी भारंबे यांच्या निवासस्थानी करण्यात आले होते. यामुळे मथुरा कृष्ण जन्मभूमी मुक्तीसाठी लढा अधिक संघटित, प्रबळ आणि परिणामकारक पद्धतीने पुढे नेण्याचा निर्धार सर्व उपस्थितांनी व्यक्त केला.



