पंतप्रधान शाहीन बागमध्ये का गेले नाहीत : काँग्रेस

नवी दिल्ली वृत्तसंस्था । गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलन करणार्‍या महिलांच्या भेटीसाठी पंतप्रधान मोदी हे शाहीन बागमध्ये का गेले नाहीत ? असा प्रश्‍न काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी आज केला आहे.

शाहीन बागमध्ये नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनावरून राजकारण पेटले आहे. भाजपने शाहीन बागवरून विरोधकांना लक्ष्य केले तर विरोधकांनीही याला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. लोकसभेतील काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली. ते म्हणाले, तिहेरी तलाक विधेयकाच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुस्लिम भगिनींसाठी अश्रू ढाळले होते. जर पंतप्रधान मोदी प्रामाणिक आहे तर त्यांनी आता शाहीन बागला जायला हवे, तेथे गेल्या काही आठवड्यांपासून माताभगिनी आंदोलन करत आहेत. यामुळे पंतप्रधान मोदी हे शाहीन बागमध्ये का जात नाहीत असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला आहे.

Protected Content