नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना मदत मिळावी : शिवसेना-उबाठाची मागणी

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | निसर्गाच्या आपत्तीचा फटका बसलेल्या तालुक्यातील शेतकर्‍यांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे करण्यात आली आहे.

 

तालुक्यात शेतकरी बांधवांना काही दिवसापुर्वीच अवकाळी पाऊस व वादळाचा आसमानी सुलतानी असा प्रचंड फटका बसल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. पा शेतकर्‍यांमध्ये बिगर विमाधारक शेतकर्‍यांना केळी पिंकाच्या नुकसानीचे २ लाख रुपये सरसकट भरपाई शासनाने द्यावी याशिवाय शेतकर्‍यांच्या हिताच्या विविध मागण्यांचे निवेदन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) च्या वतीने तहसीलदार यांच्याकडे करण्यात आली आहे .

शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने तहसीलदार मोहनमाला नाझीरकर देण्यात आलेल्या निवेदनात शिवसेनेने म्हटले आहे की यावल तालुक्यात मागील आठवड्यात संपूर्ण यावल तालुक्यात व परिसरात मोठ्या प्रमाणावर नैसर्गिक अवकाळी पाऊस व वादळीवारा झाल्याने मोठ्या प्रमाणावर केळी उत्पादक शेतकरी यांचे नुकसान झाले असून या आपत्तीमुळे शेतकरी बांधवांचे मोठया प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे. ज्या शेतकर्‍यांनी पिक विमा भरलेला आहे त्यांना विमा कंपनी कडून दिलासा मिळाला आहे.परंतु ज्या शेतकर्‍यांनी विमा काढलेला नाही लागवडीच्या खर्चामुळे व आर्थिक अडचणीमुळे विमा हप्ता भरू शकलेले नाही अशा शेतकर्‍यांना शासना ( केळी पिकास )प्रति हेक्टरी दोन लाख रुपये नुकसान भरपाई देवुन त्यांच्या झालेल्या प्रचंड नुकसानातुन आर्थिक सहकार्य मिळावे.

 

यावेळी ओढवलेल्या तीव्र्र तापमान , अवकाळी गारपीट, प्रचंड वेगाने आलेल्या वादळ या तिहेरी संकटात शेतकरी बांधव सापडलेले असुन, या संकट काळातुन उभारणीसाठी शेतकर्‍यांना नवीन केळी लागवडीस जाचक अटी त्रुटी दुर करून सरकट अनुदान देण्यात यावे. तसेच या आसमानी संकटात सापडलेल्या बिगर विमा शेतकर्‍यांचे पालकतत्व स्विकारून शेतकर्‍यांना या आर्थिक संकटातुन बाहेर काढावे असे या निवेदनात म्हटले आहे. दरम्यान आजच्या स्थितीला शेतकर्‍यांच्या घरात कधी तरी भाव वाढतील या आशेने आपल्या घरात भरून ठेवले आहे. अशा शेतकर्‍यांच्या कापसाची प्रति क्विंटल १५ हजार रूपये प्रमाणे हमीभावाने खरेदी करून आर्थिक संकटातील शेतकर्‍यांना दिलासा द्यावा अशी मागणी शिवसेना (ठाकरे ) गटच्या वतीने करण्यात आली आहे.

 

या या निवेदनावर शिवसेना ( ठाकरे ) गट यावल शहराध्यक्ष जगदीश कवडीवाले . शरद कोळी , सागर देवांग , संतोष धोबी , पप्पु जोशी , माजी सेना तालुका प्रमुख कडु पाटील , सौ .बेबाबाई कडू पाटील, डॉ विवेक अडकमोल, विजय पंडीत , हुसैन तडवी , योगेश चौधरी ,प्रविण लोणारी , भरतसिंग राजपुत यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

Protected Content