ठाकरे सरकार हे कुटुंब नसून लिव्ह इन रिलेशनशिप- विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस

मुंबई वृत्तसंस्था । राज्यातील महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार हे एक कुटुंबाप्रमाणे असल्याचे दाखवले जात आहे. खरं तर हे कुटुंब नाहीच आहे. एकमेकांशी सुसंवाद नसलेले हे सरकार म्हणजे कुटुंब नसून ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज केली.

मी इतिहासाचा अभ्यासक आहे. अशा प्रकारचे सरकार कधीच चालेले नाही. या सरकारमध्ये काँग्रेस आहे. त्यामुळे काँग्रेस हे सरकार चालू देणार नाही. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात काहीही म्हणो काँग्रेसनेही असे सरकार कधीच चालू दिलेलं नाही. लिव्ह इन रिलेशनशिप मधले हे सरकार अंतर्विरोधानेच पडेल, असंही ते फडणवीस म्हणाले.

राज्यात करोनाचे संकट असल्यामुळे हातपाय गाळून बसणे परवडणार नाही. राज्याची अर्थव्यवस्था उभी करायची असेल तर राज्य सरकारने धाडसी निर्णय घेण्याची गरज आहे. निदान अर्थचक्र गतीमान करण्यासाठी नेमलेल्या समितीने दिलेल्या अहवालाची अंमलबजावणी तरी केली पाहिजे, असा सल्लाही त्यांनी दिला.राज्यात करोनाचं संकट आहे. त्यामुळे सरकारला दोन आघाड्यांवर लढावं लागणार आहे. करोनाशी सामना करतानाच राज्य सरकारला राज्याची अर्थव्यवस्थाही रुळावर आणावी लागेल. त्यासाठी आजपासूनच तयारी करावी लागेल. त्याकरिता धाडसी निर्णय घेतले पाहिजे. नाही तर आगामी काळात उद्योग आणि सेवा क्षेत्रावर त्याचा परिणाम होऊ शकतो. हातपाय गाळून बसणं राज्याला परवडणार नाही, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Protected Content