Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

यात्रेला जात असल्याचे सांगून जैतपूर येथील तरूण बेपत्ता

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील जैतपूर गावातून ३० वर्षीय तरुण हा भीमाशंकर येथे यात्रा पाहण्यासाठी जात असल्याचे सांगून ३० जानेवारी पासून बेपत्ता झाला आहे. शोधाशोध करून तरूणाबाबत कोणतीही माहिती न मिळाल्याने अखेर शुक्रवारी १६ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजता मारवड पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे. रवींद्र शहादु भील (वय-३०) रा. जैतपीर ता.अमळनेर असे बेपत्ता झालेल्या तरुणाचे नाव आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, रविंद्र भिल हा तरुण ३० जानेवारी रोजी सकाळी ८ वाजता भीमाशंकर येथे यात्रा बघण्यासाठी जात आहे, असे लहान भावाला सांगून तो घरातून बेपत्ता झाला. त्यानंतर तो घरी आला नाही, त्याचा सर्वत्र शोध घेतला. परंतु त्याच्या संदर्भात कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर १६ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजता मारवड पोलीस ठाण्यात खबर देण्यात आली. त्यानुसार पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ शरीफ खान पठाण हे करीत आहे.

Exit mobile version