Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पोलीसात तक्रार देण्यावरून दोन गटांमध्ये दंगल

FIR

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | पोलिसात तक्रार देण्याच्या वादातून दोन गटांमध्ये दंगल झाली असून या प्रकरणी परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

या संदर्भातील माहिती अशी की, यावल तालुक्यातील भोरटेक येथे दोन गटांमध्ये दंगल झाली. यात भोरटेक येथील विनोद उर्फ स्वामी रवींद्र कोळी (वय २८) यांच्या फिर्यादीनुसार शुक्रवारी रात्री ८.३० वाजता जुन्या भांडणात पोलिसांत तक्रार दिल्याच्या कारणावरून गावातील भास्कर रमेश कोळी, बंटी भास्कर कोळी, गोकुळ मधुकर कोळी, किशोर संजु कोळी,गोलू संतोष कोळी, धनराज आनंदा कोळी, रमेश भागवत कोळी, योगेश अनिल कोळी, जितेंद्र मधुकर कोळी, डिगंबर संतोष कोळी व अरुण रमेश कोळी या ११ जणांनी त्यांच्यासह त्यांचे काका लिलाधर मोतीराम कोळी, वडील रवींद्र कोळी, आई नर्मदा व भाऊ मनोज यांच्यावर हल्ला चढवला. त्यात चौघे जखमी झाले. चारचाकी वाहनाची तोडफोड करत दोन दुचाकी जाळून टाकल्या. या अनुषंगाने संबंधीतांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, दुसर्‍या गटाकडून देखील भास्कर रमेश कोळी (वय ४२) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार रामचंद्र मोतीराम कोळी याचेविरुद्ध पोलिस ठाण्यात तक्रार दिल्याचे वाईट वाटून विनोद उर्फ स्वामी रवींद्र कोळी, रवींद्र मोतीराम कोळी, मनोज रवींद्र कोळी, गोटू रामचंद्र कोळी, रामचंद्र मोतीराम कोळी, लिलाधर मोतीराम कोळी, सचिन लिलधार कोळी (रा. भोरटेक), किरण कोळी, रोहित मोहन तायडे, वैभव हेमंत कोळी (रा.पाडळसे) व पंकज कोळी (रा.बामणोद) या ११ जणांनी भास्कर कोळी यांच्या घरावर हल्ला चढवला. त्यात तीन जण जखमी झाले. दुचाकीची तोडफोड केली. या प्रकरणी देखील यावल पोलीस स्थानकात गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली आहे.

Exit mobile version