Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शहापुर येथील विकास सोसायटीचे सचिव यांच्याबाबत लेखी तक्रार

अमळनेर प्रतिनिधी । गेल्या सहा महिन्यांपासून विविध कार्यरत संस्थांचे सचिव ड्युटीवर हजर नसल्याची तसेच गेल्या पाच वर्षांत एकही मासिक बैठक झाली नसल्याची तक्रार शहापूर तालुक्यातील राजेंद्र माळी यांनी सहाय्यक निबंधकांकडे केली आहे.

येथील विकास सोसायटीचे सचिव श्री भगवान पवार यांनी गेल्या पाच वर्षापासून त्यांनी एकही मासिक मिटिंग घेतली नसून गेल्या सहा महिन्यात एकदाही ते कार्यालयात उपस्थित राहत नसल्याची तक्रार माजी विकास सोसायटी चे संचालक राजेंद्र मला माळी यांनी अमळनेर येथे सहाय्यक निबंधक यांच्याकडे केली आहे. सचिव भगवान पवार यांच्याकडे वारंवार सभेबाबत  विचारणा केली असता ते संस्था डबगाइस गेली असल्याचे कारण देऊन उडवा उडवीचे उत्तर देतात. त्याचे सबळ कारण त्यांनी द्यावे कार्यालयात उपस्थित राहावे अशीही मागणी त्यांनी केली असून याची चौकशी करून लोकांच्या समस्याचे निराकरण करावे अशीही मागणी राजेंद्र माळी यांनी केली आहे.

 

Exit mobile version