Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

घराकडे का आला? अशी विचारणा करीत तरुणास मारहाण; दोघांवर गुन्हा

जळगाव प्रतिनिधी । ‘आमच्या घराकडे का आला?’ अशी विचारणा करीत तीन तरुणांनी एकास बेदम मारहाण केली. १५ एप्रिल रोजी रात्री ७.३० वाजता हिराशिवा कॉलनीत ही घटना घडली. उपचार घेतल्यानंतर दहा दिवसानंतर तालुका पोलीसात दोन जणांवर गुन्‍हा दाखल करण्यात आला आहे. 

अधिक माहिती अशी की, शुभम शरद जोशी (वय २४, रा. दादावाडी) असे जखमी तरुणाचे नाव आहे. १५ एप्रिल रोजी सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास शुभम हा हिराशिवा कॉलनीत गेला होता. महेश वासुदेव पाटील, गौरव पाटील व गणेश पाटील (तिघे रा. हिराशिवा कॉलनी) यांना या गोष्टीचा राग आला. ‘आमच्या घराकडे का आला?’ अशी विचारणा करीत या तीघांनी शुभम याला बेदम मारहाण केली. महेश पाटील योल लोखंडी रॉड डोक्यात मारला. यात शुभम जखमी झाला होता. त्याच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले. दहा दिवसानंतर २५ एप्रिल रोजी सायंकाळी शुभमने दिलेल्या फिर्यादीवरुन तीघांच्या विरुद्ध तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिनेश पाटील तपास करीत आहेत.

Exit mobile version