Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मोरे व जाधव यांच्या हत्या कुणी केल्या ? : राणेंचा उध्दव ठाकरेंना सवाल !

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | उध्दव ठाकरे यांनी आपल्याला मारण्यासाठी सुपारी दिली होती असा खळबळजन आरोप करतांनाच रमेश मोरे आणि जयंत जाधव यांच्या कुणी केल्या होत्या ? असा प्रश्‍न केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी थेट उध्दव ठाकरेंनाच केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

आमदार नितेश राणे यांनी दोन दिवसांपूर्वीच आपल्या वडलांना मारण्याची सुपारी देण्यात आली होती असा दावा केला होता. यानंतर आज थेट नारायण राणे यांनीच उध्दव ठाकरेंनी आपल्याला मारण्याची सुपारी दिली असल्याचा सनसनाटी आरोप केला. ते म्हणाले की, उध्दव ठाकरे हे अतिशय दुष्ट बुध्दीचे आहेत. त्यांनी मला मारण्यासाठी सुपार्‍या दिल्या होत्या. तसेच रमेश मोरे यांची हत्या कोणी केली? जयंत जाधव यांची हत्या कोणी केली? ठाण्याचा नगरसेवक याची हत्या कोणी केली? असे प्रश्‍न देखील त्यांनी विचारले. तसेच त्यांनी उध्दव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर घणाघाती टीका केली.

06:32 PM
Exit mobile version