Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मुंबईत कॉंग्रेसचा महापौर कधी होता? खा. राऊत

मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा | मुंबई महानगरपालिका प्रभाग रचनेवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नाराजी व्यक्त केली. यावर कॉंग्रेसचा महापौर कधी होता? असा प्रश्न काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पटोले यांना विचारत शिवसेनचे खा.संजय राउत यांनी टीका केली.

गेले अनेक वर्षे मुंबई महापालिकेवर काँग्रेसचे महापौर होते, पण कधीच मुंबई पाण्याखाली गेलेली नाही, अशी टीका करीत मुंबई महानगरपालिका निवडणूक पार्श्वभूमीवर प्रभाग रचनेवर नाराजी व्यक्त केली. तसेच सोयीनुसार वार्ड पुनर्रचना केली गेली  असून याबाबत न्यायालयात न्याय मागू, असे हि पटोले म्हणाले. यावर कधीकाळी मुंबईवर कधी काळी कॉंग्रेसचे राज्य होते. त्यावेळी कॉंग्रेसमध्ये नेतृत्व होते. पण पटोले यांनी हे लक्षात घेतले पाहिजे कि, मुंबईत शिवसेनचाच महापौर असून मुंबई कधी तुंबली याची माहिती पाहिजे असेल तर पाठवतो. परंतु त्यांनी अगोदर कॉंग्रेसचा नीट अभ्यास करावा आणि कॉंग्रेसचा महापौर कधी होता ते तरी आठवते का? हेही पाहावे. मुंबईत कॉंग्रेस वाढावी अशी आमचीही अपेक्षा असल्याचे खा. राउत यांनी टीका केली .

 

 

Exit mobile version