Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

सरकार स्थापन झाल्यावर मोठ्या भावाला भेटायला दिल्लीत जाईन – ठाकरे

udhdhav thakaray

मुंबई, वृत्तसंस्था | सरकार स्थापन झाल्यावर मोठ्या भावाला भेटायला मी दिल्लीत जाणार आहे, असाही टोला उद्धव ठाकरेंनी आज येथे भाजपला लगावला. येथील हॉटेल ट्रायडंटमध्ये सायंकाळी झालेल्या सरकार स्थापनेबाबतच्या महाविकास आघाडीच्या बैठकीत ते बोलत होते.

 

संघर्षात विजय मिळाला की, बाळासाहेब ठाकरेंची आठवण नक्की येते. मला काहीतरी व्हायचे आहे, हा विचार स्वप्नातही केला नव्हता. माझ्या आजोबांपासून जी परंपरा आहे, तीच सांभाळण्याचा प्रयत्न मी करतो आहे. आज सगळ्यांना धन्यवाद देतो आहे. सोनिया गांधी यांनाही धन्यवाद देतो आहे.

मला आश्चर्य एकाच गोष्टीचे वाटते ३० वर्षांपासून मैत्री असलेल्या पक्षाने माझ्यावर विश्वास दाखवला नाही. मात्र ज्यांच्याशी सामना केला त्या विरोधकांनी माझ्यावर विश्वास दर्शवला. सगळ्यांचेच मी आभार मानतो, असेही उद्धव ठाकरेंनी यावेळी म्हटले.

मुख्यमंत्र्याची खुर्ची म्हणजे काट्यांची असते, जाणारा तिला आणखी खिळे लावून जातो. ते सगळे खिळे ठोकण्यासाठीचा हातोडा माझ्या हाती तुमच्या रुपाने आहे, असेही उद्धव ठाकरेंनी यावेळी म्हटले. दिलेला शब्द मी कधीही खाली पडू देत नाही. खोट्याची साथ मी कधीही देणार नाही, असे सांगत त्यांनी भाजपाला सुनावले.

Exit mobile version