Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पहिल्या टप्प्यात विक्रमी मतदानाची शक्यता : उमेदवाराने तोडले इ.व्ही.एम.

images 7

नवीदिल्ली (वृत्तसंस्था) लोकशाहीच्या महापर्वातील पहिल्या अध्यायाला आज सुरुवात झाली आहे. देशाच्या संसदेत आपला लोकप्रतिनिधी पाठविण्यासाठी सर्वसामान्य नागरिक आज मतदानाचा हक्क बजावत आहे. सकाळ पासूनच सर्वत्र मतदानाचा उत्साह दिसून आला असून विक्रमी मतदान होण्याची अपेक्षा तज्ञांनी व्यक्त केली आहे. आंध्र प्रदेशातील जनसेना पार्टीच्या विधानसभा उमेदवाराने चक्क ईव्हीएम मशिनच जमिनीवर आदळले. या घटनेनंतर, पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

 

दरम्यान १७ व्या लोकसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यासाठी देशाच्या विविध राज्यातील ९१ मतदारसंघात आज मतदान होत आहे. मतदान सकाळी ७.०० वाजल्यापासून सुरुवात झाली आहे. आंध्रप्रदेश, तेलंगाना, जम्मू-काश्मीर या राज्यांसह पुर्वोतर भागातील काही राज्ये आणि उत्तरप्रदेश, महाराष्ट्र व बिहारचा काही भाग अशा ९१ मतदार संघात सुमारे १४ कोटी जनता आज मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

आंध्र प्रदेशमध्ये लोकसभेच्या २५ जागांसह विधानसभेच्या १७५ जागांसाठी मतदान होत आहे. सकाळी ७.०० वाजल्यापासूनच मतदान केंद्रांवर लोकांच्या रांगा लागल्या आहेत. आंध्र प्रदेशमधील जनसेना पक्षाचे विधानसभा उमेदवार मधुसुदन गुप्ता यांनी चक्क मतदान केंद्रातील ईव्हीएम मशिनच जमिनीवर आदळली. अनंतापूर जिल्ह्यातील गुटी मतदान केंद्रावर हा प्रकार घडला आहे. मशिन सातत्याने बंद पडल्याच्या घटना घडत असल्याने ईव्हीएम मशिन बोगस असल्याचे सांगत रागारागात गुप्ता यांनी ईव्हीएम मशिन दोन्ही हातांनी हातात घेऊन जोरात जमिनीवर आदळले. त्यामुळे ईव्हीएम मशिन खराब झाले आहे. या घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ मधुसुदन गुप्ता यांना अटक केली आहे. या घटनेनंतर मतदान केंद्रावर तणावाचे वातावरण असून पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे.

Exit mobile version